भैरब, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बांगलादेशमध्ये भैरब येथे मालवाहक गाडी आणि प्रवासी गाडी यांची धडक झाली. या रेल्वे अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. ही दुर्घटना संध्याकाळी चार वाजता झाली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. अपघात प्रकरणी चौकशी होणार आहे.