Saturday, July 06, 2024 11:47:39 PM

भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

रांची, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका ३ - १ अशी जिंकली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने आणि पुढील तीन कसोटी सामने भारताने जिंकले. पाचवा कसोटी सामना मार्च महिन्यात आहे. पण हा सामना होण्याआधीच भारताने मालिका जिंकली. रांची येथे झालेली चौथी कसोटी भारताने पाच गडी राखून जिंकली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची येथे झालेल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३५३ धावा आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १४५ धावा केल्या तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ आणि दुसऱ्या डावात पाच बाद १९२ धावा केल्या.

भारताने चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली

पहिली कसोटी - हैदराबाद - इंग्लंडचा २८ धावांनी विजय
दुसरी कसोटी - विशाखापट्टणम - भारताचा १०६ धावांनी विजय
तिसरी कसोटी - राजकोट - भारताचा ४३४ धावांनी विजय
चौथी कसोटी - रांची - भारताचा पाच गडी राखून विजय

महत्त्वाचे मुद्दे

भारत विरुद्ध इंग्लंड चौथी कसोटी

भारताचा पाच गडी राखून विजय

रांची कसोटीसह भारताने मालिका ३ - १ अशी जिंकली

भारताचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल सामनावीर

           

सम्बन्धित सामग्री