Saturday, July 06, 2024 11:27:42 PM

भारत अंतिम फेरीत

भारत अंतिम फेरीत

बेनोनी, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा विजय झाला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. भारताने दोन गडी राखून सामना जिंकत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात बाद २४४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४८.५ षटकांत ८ बाद २४८ धावा केल्या.

           

सम्बन्धित सामग्री