हैदराबाद, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे आघाडी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. यानंतर भारताने सर्वबाद ४३६ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद ३१६ धावा केल्या आणि १२६ धावांची आघाडी घेतली.