केपटाऊन, ३ जनेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा पहिला दिवस दोन्ही बाजूच्या गोलंदाजांनी गाजवला. सामन्याच्या पहिल्या दिवशी २३ बळी गेले. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेला भोवला. भारताच्या मोहम्मद सिराजच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत गुंडाळला. यानंतर भारताने पहिल्या डावात सर्वबाद १५३ धावा केल्या. दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ६२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका अद्याप ३६ धावांनी पिछाडीवर आहे.
गिलचा कसोटी क्रिकेटमध्ये पराक्रम