पार्ल, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त तिसरा सामना जिंकला नाही तर त्या विजयानंतर त्यांना अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताने संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली होती. पण अर्शदीप सिंगने दोन दक्षिण आफ्रिकेचे दोन बळी बाद करत सामन्यात उत्साह वाढवला. संजू सॅमसनच्या चाहत्यांना सॅमसनचे शानदार शतकदेखील पाहायला मिळाले. त्याने ११४ चेंडूत १०८ धावा केल्या आणि त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीरदेखील संजू सॅमसनचं ठरला. त्यामुळे भारताला हा तिसरा एकदिवसीय सामना जिंकता आला. भारताने या सामन्यात तर विजय मिळवलाच पण त्याचबरोबर त्यांनी ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट असेल. भारताला या सामन्यात ७८ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.
महत्त्वाचे मुद्दे -
संजू सॅमसनचं शतक आणि उत्तम गोलंदाजी
भारताचा आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय