अहमदाबाद, १९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत भारताला चार धक्के बसले आहे. अर्धशतक करून विराट कोहली बाद झाला आहे. भारताने २९.१ षटकांत ४ बाद १५० धावा केल्या आहेत.
शुभमन गिल सात चेंडूत चार धावा करून स्टार्कच्या चेंडूवर झम्पाकडे झेल देऊन परतला
रोहित शर्मा एकतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करून मॅक्सवेलच्या चेंडूवर हेडकडे झेल देऊन परतला (३ षटकार, ४ चौकार)
श्रेयस अय्यर तीन चेंडूत चार धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर जोश इंग्लिसकडे झेल देऊन परतला (१ चौकार)
विराट कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्रिफळाचीत (४ चौकार)