Tuesday, July 02, 2024 09:37:38 AM

आझम, रिझवान बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला

आझम रिझवान बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला

अहमदाबाद, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषकातील बहुप्रतीक्षित भारत - पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा डाव १९१ धावांत आटोपला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान बाद होताच पाकिस्तानचा डाव गडगडला. पाकिस्तानने ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

https://twitter.com/BCCI/status/1713163965344473256

पाकिस्तानच्या कोणत्या फलंदाजाने केल्या किती धावा ?

बाबर आझम ५०, मोहम्मद रिझवान ४९, इमाम - उल - हक ३६, अब्दुल्ला शफीक २०, हसन अली १२, सौद शकील ६, इफ्तिखार अहमद ४, मोहम्मद नवाज ४, शादाब खान २, हारिस रौफ २. शाहीन आफ्रिदी नाबाद २ धावा.


सम्बन्धित सामग्री