Thursday, September 12, 2024 07:52:49 PM

जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा गुंडाळणार?

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे  यांनी आंदोलन सुरु केले या आंदोलनाला

जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा गुंडाळणार

कोल्हापूर : मनोज जरंगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते शांतता यात्रा काढत आहेत. या यात्रेला सांगली,कोल्हापूरमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला आहे. जरांगेच्या सभांना रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत आहेत यामुळे सातारा जिल्ह्यातील शांतता यात्रेचा कार्यक्रम रद्द करण्याची शक्यता आहे. 

कोण आहेत मनोज जरांगे ? 
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे  यांनी आंदोलन सुरु केले या आंदोलनाला मराठवाड्यातील मराठ्यांचा प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेऊन राज्य शासनाने जरांगेच्या मागण्यांना प्राधान्य दिले. यामुळे  जरांगेंनी राज्यव्यापी दौरा करून सत्ताधार्यांना आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी सुरु केलेल्या शांतता यात्रेला पश्चिम महाराष्ट्र अल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे मनोज जरंगे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा लवकर गुंडाळतील अशी चर्चा सुरु आहे. 


सम्बन्धित सामग्री