मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली आहे. मुली आणि महिलांना वाचवणे आणि त्यांना सुरक्षित ठेवणे हे महाराष्ट्राचे कर्तव्य आहे. या विषयावर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रभर आंदोलन करणार असून, प्रत्येक शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पटोले यांनी म्हटले की, मुलींच्या सुरक्षेसाठी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. मुलींना संध्याकाळी ७ नंतर घराबाहेर निघण्यास बंदी घालावी अशी मागणी फेटाळली गेली आहे परंतु परिस्थिती खूपच धोकादायक आहे. त्यांनी महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच शाळा-कॉलेजच्या भिंतींवर पोस्टर लावून आम्ही तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे आश्वासन काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांना देणार आहे.
नाना पटोले यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की सरकार निवडणुका घेण्यास घाबरले आहे. म्हणत त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन या संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.