ठाणे : ठाण्यात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. राशपचे शानू पठाण यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तालयाच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन चालु आहे. पाण्याची मागणी पूर्ण न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढणार असा इशाराही पठाण यांनी दिला आहे. टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंब्रा - कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच ठिया आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता.