२४ जुलै, २०२४ मुंबई : श्याम मानव यांचे आरोप फडणवीस यांनी फेटाळले आहेत. 'देशमुखांविरोधात पुरावे असल्यानेच कारवाई झाली होती त्यांना अटक झाली होती', असं म्हणत फडणवीसांनी देशमुखांचा बुरखा फाडला आहे.
उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अंनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर देत 'श्याम मानव हे देखील काही सुपारीबाजाप्रमाणे सुपारी घेऊन आपल्यावर असे आरोप करत आहेत का? हे पाहावं लागेल' असं प्रत्युत्तर दिले होते. आता याच मुद्दावरुन श्याम मानव यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे.