बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. देशमुखांच्या हत्येने राज्यातील वातावरण तापले आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रभर संताप व्यक्य केला जात आहे.
या हत्येप्रकरणी उद्या बीड बंद राहणार आहे. बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच शरद पवार सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केली गेली. काहीही कारण नसताना त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
खंडणी गोळा करण्याच्या प्रकरणातून एका वॉचमनला मारहाण करण्यात आली. त्याच्या तक्रारीवरून सरपंच संतोष देशमुख यांनी प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर गुंड्यांनी देशमुख यांना अडवले आणि त्यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीमधूनच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. काही दिवसांनी शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला. या अहवालात त्यांचे हात, पाय, डोळे यांना गंभीर मार लागल्याचे समोर आले. देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आले. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका झाली.
हेही वाचा : Satish Wagh Murder Case: मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणाने महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याच घटनेचे हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटल्याचे दिसून आले. शरद पवार आणि अजित पवार यांनी देखील देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया मांडली. आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यानंतर मास्टरमाईंड कोणीही असो सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. देशमुख हत्या प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.