मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शनिवारी रात्री दक्षिण मुंबईच्या जागेवरुन बैठक पार पडली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघांचा तिढा पुढच्या दोन दिवसांत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, पियूष गोयल उपस्थित होते. इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघांनाही मतदारसंघात काम सुरू ठेवण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.