मुंबई, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उद्या शिवाजी पार्क येथे भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. त्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेते जागावाटपावर अंतिम निर्णय घेणार आहेत. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.