मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर येथून सुरूवात केली. ही भारत जोडो न्याय यात्रा रविवारी १७ मार्च रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. या यात्रेची सांगता मुंबईतून होणार आहे. शिवाजी पार्क येथे स्टेज उभारण्यास सुरूवात झाली असून ८८*५६ चा हा स्टेज सात फूट उंचीचा असणार आहे. राहुल गांधी मुंबईत जनतेला संबोधित करणार आहेत.