Sunday, July 07, 2024 08:34:03 PM

'उद्धव ठाकरेंनी मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही'

उद्धव ठाकरेंनी मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही

मुंबई, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी कोस्टल रोडच्या एका लेनचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिउबाठावर जोरदार निशाणा साधला आहे. काही लोक श्रेय घेतल्याची टीका करत आहेत. पण, आम्ही दुसऱ्याचं श्रेय कधी लाटत नाही, 'उद्धव ठाकरेंनी मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही' तसेच माझी इच्छा असती तर मी काम थांबवू शकलो असतो परंतु आम्हाला राजकारणात नाही तर विकासात स्वारस्य असं फडणवीस म्हणाले.

https://youtu.be/51fxQNTMqSA?si=9CR6hV8ZCCBjsXLc

'उद्धव ठाकरेंनी मला भूमिपूजनालाही बोलावलं नाही'

आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे हेही लोकांना कळलं पाहिजे, हे सगळं करुन मी आणलं, पण ज्यावेळी याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी मला भूमिपूजनलाही उद्धव ठाकरेंनी बोलवलं नाही, अशी खंत देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली. तसेच, श्रेयाकरिता आम्ही कधीच लढलो नाही, कारण मी मुख्यमंत्री होतो, मी भूमिपूजन रोखू शकलो असतो, आयुक्तांना ते सांगूही शकलो असतो. पण, आम्हाला मुंबईचा विकास हवाय, आमच्यापेक्षा मुंबई मोठी आहे, आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एखादा देवेंद्र फडणवीस राहिल, जाईल. पण, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण करु शकलोय, त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत. त्यामुळे, कोत्या मनाची लोकं काय असतात, आणि मोठ्या मनाची लोकं काय असतात हे निश्चितपणे आपल्याला यातून लक्षात येईल, असेही फडणवीसांनी म्हटलं.


सम्बन्धित सामग्री