Saturday, September 28, 2024 07:49:22 PM

'धारावीतील मोर्चाची चेष्टा करता'

धारावीतील मोर्चाची चेष्टा करता

मुंबई , १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला देण्यात आलं आहे. याच विरोधात उद्धव गट आक्रमक झाला आहे. शनिवारी अदानींविरोधात उद्धव गटाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. 'मोर्चा धारावीचा' लोक राज्यभरातील अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव गटावर केली होती. शिंदे गटाकडून होणाऱ्या टिकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की,
धारावीमध्ये निघालेल्या मोर्चाची चेष्टा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात. तुम्ही कोणाची दलाली करता? उद्योगपतीची की भांडवळ दराची असा प्रश्न राऊत यांनी केला आहे. मोर्चेतील सगळी लोक चंद्रावरून आली होती. पण, प्रश्न मुंबई आणि धारावीचा होता ना? लोक चंद्रावरून किंवा मंगळावरून येऊद्या. मुख्यमंत्र्यांना काही कळतं का?” अशी टीका राऊतांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री