रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार विश्रामगृहावर किंवा मोठे कार्यक्रम घेऊन होत नाही, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगावला आहे.
खासदारकीचा उमेदवार महाराष्ट्राचे तीन नेते ठरवतात. तर भाजपचा उमेदवार मोदी, शहा आणि नद्दा ठरवतात. अशी प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात बोलताना सामंत यांनी दिली आहे. भाजपचे कार्यकर्ते विशाल परब हे खासदारकीच्या उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हात विविध कार्यक्रम घेत आहेत. या अनुषंगाने हा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगावला आहे.