Saturday, July 06, 2024 11:58:00 PM

मराठाप्रश्र्नी सरकार सकारात्मक, कायद्याच्या चौकटीत निर्णय होईल

मराठाप्रश्र्नी सरकार सकारात्मक कायद्याच्या चौकटीत निर्णय होईल

नाशिक, ११ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना महत्वाच्या बाबी मांडत सडकून टीकास्त्र देखील केले. पाहुयात त्यांनी काय म्हंटले.

मराठा आरक्षण बैठक

मराठा आरक्षणाबाबबत बोलताना ते म्हंटले की, बैठकीत तोडगा निघावा हा आमचा प्रयत्न आहे. माझी जरांगे पाटील यांना विनंती त्यांनी उपोषण सोडावे. त्यांनी पाणी सोडले आहे, त्यामुळे त्यांची तब्येत खराब होत आहे. जरांगेचे शिस्टमंडळ आले होते त्यात चर्चा झाली होती. त्याकरिता तात्काळ जीआर काढला तर टिकणार नाही. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. त्यातून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. जर सरसकट आरक्षण दिले तर ते तांत्रिक दृष्ट्या टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातूनच हा मार्ग निघेल. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाला त्यांनी वेळ द्यावा.

जरांगे मागणी

मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. सुरुवातीला त्यांची मागणी वेगळी होती. कुणबी समाज वेगवेगळ्या भागात आहे. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करत आहेत की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. तर हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. हे अश्यक्य आहे, त्यासाठी कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही. पहिल्याच दिवशी ते फेटाळला जाईल तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे.

बैठक निमंत्रण

सगळे छोटे मोठे विरोधी पक्ष नेत्याच्या लोकांना बोलावलं आहे. उदयनराजे संभाजी राजे यांना देखील बोलावलेल आहे. जर सगळे समाज रस्त्यावर उतरले तर राज्याचे हिताचे होणार नाही.

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं बरोबर आहे. पण सगळेच लोक मागणी करू लागतील. पश्चिम महाराष्ट्रातील लोकही बोलतील. आरक्षण सर्वांनाच पाहिजे आहे कुणाला नको आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे.

उद्धव ठाकरे जळगाव सभा

उद्धव ठाकरे यांच्यावर सगळे लोक हसायला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल ते शिलक्या भाषेत आणि खालच्या भाषेत बोलायला लागले आहेत.
ठाकरेंकडे फक्त दोन-चार लोक राहिले तो विषय वेगळा आहे. पण देवेंद्रजी बद्दल उद्धव ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्यानं ते असं बोलत आहेत. त्यांच्या मागे कोणी राहिलेलं नाही म्हणून ते अस्वस्थ झालेत. आम्हाला त्यांच शारीरिक व्यंग काढायचं नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावं? त्यांचेच पंतप्रधान होण्याबाबत बॅनर लागले. विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावं लागतं पण त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे ? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले ? त्यांच्या मनात काही काळभेर नाही ना? त्यांना तर असं काही करायचं नाही ना अशी शंका यायला लागली आहे. संजय राऊत हे तर लोकांना उकवायला लागले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे अतिशय बाली स्टेटमेंट करत आहेत. त्यांनाच काही घडून तर आणायचं नाही ना? यांची चौकशी झाली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाच पाहिजे.

सातारा दंगल

राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची? कुणाला दंगली घडवायच्या आहेत ? याची चौकशी झाली पाहिजे. जाणीवपूर्वक अस्थिरता कोण वाजवतंय ? आणि याला कोण खतपाणी घालत आहे. याचीही चौकशी पोलीस करत आहेत.

शिवसेना आमदार सुनावणी

नियमाप्रमाणे जे आहे, तेच कोर्टाने सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे चौकशी सुरू आहे. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे.

अजित पवार दावा

२०१४ ते २०१९ साली शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का ? पवार साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका आम्ही पाठीशी आहोत. ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा शिवसेना थोडी नाटक करायला लागली होती. तेव्हा २०१९ मध्ये निवडणूक झाल्यावर त्यांनी चार - चार वेळा दिल्लीत मिटींग केल्या होत्या. त्यावेळी अजित दादा गेले आणि ही आमची खेळी होती असे त्यांनी सांगितले. ते आमच्या सोबत होते आणि हा त्यांचा मानस होता. परंतु त्यांनी आम्हाला गाफील ठेऊन खरी गुगली टाकली. घात करायचा ही ठाकरेंची परंपरा आहे. दादा म्हणत आहेत ते 100 टक्के खरं आहे. २०१४ साली त्यांनीच उघड पाठिंबा दिला होता. त्यांनी सांगितलं म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या. आमच्याच नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या पालकमंत्री पदाच्या वाटाघाटी केल्या. आता दादा म्हणत आहेत तेच खरं आहे आणि अजितदादा देखील त्या बैठकीला उपस्थित होते हे शरद पवार नाकारू शकत नाही.

शरद पवार जी २० टीका

आपला देश विश्वगुरू होण्याच्या मार्गावर आहे. सोन्याच ताट कोणी जेवायला ठेवतं का? मग काय आता त्यांना केळीच्या पानावर जेवायला द्यायचं.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे मागे कोणी नाही म्हणून ते अस्वस्थ झालेत. ते आता बेरक प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत आणि त्यांच्याकडे कोणी जायला तयार नाही तर हे काय घेतील.

बबनराव घोलप

बबनराव घोलप गच्चीती करण्यात आली नाही. ती त्यांनीच करून घेतली. आता शिवसेनेत कोणी राहिले नाही. एक दोन महिने थांबा अजून कोणीही राहणार नाही. मुख्यमंत्री असताना कुणालाही वेळ दिला नाही दादागिरी केली आणि घरात बसून कारभार केला त्यामुळे सगळेजण त्यांच्यावर नाराज होते.

कमळाबाई पालखी

२५ वर्षे यांनी काय बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का ? तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोये सुद्धा मिळत नाहीत. ९०% शिवसेना आमच्या सोबत आहे. त्यामुळे ते काय बोलत आहे कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटलं त्यांची मनस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर हा असा दिसतो तो तसा दिसतो असे आम्हीही बोलू शकतो.

सामना


सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे. त्याला महत्त्व देऊ नका. ४८ पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. राऊत साहेबांनी सुरक्षित मतदार संघ शोधून निवडून येऊन दाखवावे.

हायटेक कॉपी

तांत्रिक गोष्टी परीक्षा केंद्र पर्यंत पोहोचू शकत नाही. भविष्यकाळात अशी अडचण येणार नाही याची काळजी घेऊ. सगळीकडे आम्हाला गांभीर्याने बघावे लागेल. ऑनलाइन परीक्षा असल्याने अडचणी येत आहेत. याकडे आम्ही लक्ष देत आहोत.


सम्बन्धित सामग्री