नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत मणिपूर मुद्यावर आक्रमक झाले. त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्त्युतर दिले आहे. भाषाणाच्या सुरुवातीलाच ‘यू आर नॉट इंडिया’ असं स्मृती इराणी म्हणाल्या.
संसदेत स्मृती इराणी या प्रत्त्युतर देत म्हणाल्या,
देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होत. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे”.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.