१५ जुलै, २०२४ मुंबई : आषाढी वारीच्या निमित्ताने भाजपाकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचत आहेत.
भाजपाकडून आषाढी वारीसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून ही विशेष ट्रेन सुटणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दुपारी ३.३० वाजता या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या विशेष ट्रेनचे नियोजन केंद्रीय मंत्री मंगल प्रभात लोढा पाहत आहेत. यामुळे, विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे.