मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मुख्यतः स्वाइन फ्लू आणि गॅस्ट्रो या आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. व्हायरल संसर्गाच्या विषाणूने सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण तर दूषित पाणी पोटात गेल्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. अशी परिस्थिती असली तरी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.