१३ जुलै, २०२४ मुंबई : अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
अंधेरी सबवे मध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. तसेच, चाकाला भागातही पाणी पोचण्यास सुरुवात झाली आहे. वाहतुकीसाठी गोखले पुलाचा वापर करण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील ३६ तास मुंबईकरांसाठी महत्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे. २०० मिमी पाऊस कोसळणार असल्याचा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात येत आहे. शनिवारी दिवसभर मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची संततधार सुरूच आहे.