मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : केंद्र सरकारकडून नुकताच ‘नॅशनल क्रिएटर अवार्ड’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मल्हार कळंबे या तरूणाचा स्वच्छता अम्बेसिडर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून बीच प्लिज या संस्थेद्वारे त्याची टीम मुंबईतील समुद्रकिनारे साफ करत होती. या संस्थेने ५२० क्लिन- अप ड्राइव्ह करून आठ लाख किलोंपेक्षा जास्त कचरा साफ केला आहे.