२६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह आलेल्या लाखो मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबईतच थांबला आहे. मुक्काम वाढल्याने एपीएमसी बाजारपेठ शनिवारी सुरु राहणार की बंद याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी आपली भूमिका मांडत असे म्हंटले की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत आहेत तोपर्यंत एपीएमसी बाजारपेठ सुरु करू शकत नाही. आमचं कितीही नुकसान झाले तरी चालेल मुंबईला पुरवठा झाला नाही तरी चालेल त्याचा विचार सरकारने करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.