Wednesday, July 03, 2024 12:12:44 PM

नवी मुंबई भाजीपाल्यांची आवक घटलेलीच

नवी मुंबई भाजीपाल्यांची आवक घटलेलीच

नवी मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकार मध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून ट्रक चालकांनी या निर्णयाचे स्वागत करत आपला संप मागे घेतला आहे. रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात पाठवला नसल्याने आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. कालही दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्याने दर ३० टक्क्यांनी वधारले आहेत.


सम्बन्धित सामग्री