मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: 'गेल्या वर्षभरापासून वडापाव पहिला की आताच्या राज्य सरकारची आठवण होते' अशी मिश्किल टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 'देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला वाद म्हणजे अजित पवार आहेत का ? अजित पवार आणि फडणवीस यांच्यातील वडा एकनाथ शिंदे आहेत ?' असही राज ठाकरे पुढे म्हणाले आहेत.