मुंबई, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाचे विधानसभेतील आमदार नितेश राणे यांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी विधानमंडळ सचिवालयाला पत्र पाठवले आहे.
उद्धव गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांविरोधात नितेश राणेंनी हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. राऊत आणि दानवे यांनी विधानसभाध्यक्षांवर दबाव टाकण्यासाठी राजकीय वक्तव्ये केली आहे. ही वक्तव्ये करून राऊत आणि दानवे यांनी विधानसभाध्यक्षांचा पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.