३ ऑगस्ट, २०२४ कोल्हापूर : 'राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना मदत करावी', अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेता राजू शेट्टी यांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा जोर कमी होऊनही नदीपात्रातून बाहेर आलेले पाणी अजूनही ओसरले नाहीये. यामुळे, ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला यासह इतर पिकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. यामुळे राज्य सरकारने पुरग्रस्तांना २०१९ च्या धर्तीवर कोणतेही निकष न लावता मदत करण्याची मागणी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.