१० ऑगस्ट, २०२४, गोंदिया : गोंदिया शहराला दोन भागांमध्ये विभागणारा रेल्वे पूल आहे. मात्र, या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती. याविषयी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातम्या दाखवली याची दखल घेत आता राशपने आंदोलन करत या रेल्वे पुलावरील सर्व खड्डे बुजवले आहेत. यावेळेस त्यांनी 'आजी आणि माजी आमदार हे जनतेचे आमदार नसून, कंत्राटदाराचे आमदार आहेत, कंत्राटदाराकडून ते कमिशन घेतात' असा आरोप केला आहे. यावेळी राशपने खड्डे बुजवण्याचे कार्य केले.