२० जुलै, २०२४ संभाजीनगर : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी शनिवार २० जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू केला आहे. सगेसोयरेंसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे.
जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. 'त्यांनी उपोषण करू नये, अशी मागणी जरांगेच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी येऊन जरांगेच्या सार्थकांकडून ही मागणी केली जात आहे. यावेळी, 'हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, सरकारला आरक्षण द्यायचं नाहीये शेतकऱ्याला भाव द्यायचा नाहीये, मनोज जरांगे पाटील दगडाला शेंदूर लावा म्हणाले तर, आम्ही दगडाला शेंदूर लावू', अशी भावना मराठा बांधवांनी व्यक्त केली आहे.