४ ऑगस्ट, २०२४, पालघर : पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी काठावरील १०० पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सूर्या, तानसा, पिंजाळ आणि वैतरणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.