मुंबई, ७ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळपासून सुरू झाले आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदान होत असून सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
राज्यात ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
लातूर- ७.९१ %
सांगली- ५.८१ %
बारामती- ५.७७ %
हातकणंगले- ७.५५ %
माढा- ४.९९ %
धाराशिव- ५.७९ %
रायगड- ६.८४ %
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- ८.१७ %
सातारा- ७.०० %
सोलापूर- ५.९२ %
कोल्हापूर ८.०४ %