Monday, September 09, 2024 05:58:50 PM

तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात

तिसऱ्या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात

मुंबई, २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३१७ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड १३, बारामती ३८, धाराशीव (उस्मानाबाद) ३१, लातूर २८, सोलापूर २१, माढा ३२, सांगली २०, सातारा १६, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९, कोल्हापूर २३, हातकणंगले २७ अशी आहे.


सम्बन्धित सामग्री