मुंबई, ७ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळपासून सुरू झाले आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदान होत असून दुपारी १ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
लातूर- ३२.७१ %
सांगली- २९.६५ %
बारामती- २७.५५ %
हातकणंगले- ३६.१७ %
कोल्हापूर - ३८.४२ %
माढा- २६.६१ %
धाराशिव- ३०.५४ %
रायगड- ३१.३४ %
रत्ना-सिंधु- ३३.९१ %
सातारा- ३२.७८ %
सोलापूर- २९.३२ %