पुणे, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतर सुध्दा फोटोकॉपी मिळालेली नाही.
फोटोकॉपीच हातात न मिळाल्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता आलेला नाही आणि पुढच्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. सुस्त कारभार आणि मुजोर प्रशासना मुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे याच विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात येतेय.