सातारा, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : खटाव - माण तालुक्यातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत पेयजल टंचाई निवारणार्थ १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु आहे. तर टँकर व गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाला पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे महाकठीण बनत आहे.