प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ एप्रिल २०२४ : राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या दोन दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढताना दिसतोय. उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र तापमान ४० च्या पुढे गेलेले दिसत आहे. उन्हाचा चटका वाढल्याने त्याचा जनजीवनावर परिमाण होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे, उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.