नाशिक, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात फक्त २८ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरातील आदिवासी भागात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत असल्याचे चित्र आहे. आदिवासी भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात २०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू