मुंबई, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कार्यकर्ते नेहमीच आरक्षण करताना दिसतात. राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर फसवण्याचे काम केले आहे. अनेक वर्ष झाले धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला आहे. मात्र आजपर्यंतच्या सर्वच सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता समाजाला आरक्षण नाही तर मतदानही करणार नाही असा इशारा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.