छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी खरिपाच्या पीकविम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीकविमा काढलेला आहे. त्यातील १८ हजार ५४० शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांचे पीकविम्याचे प्रस्ताव पीकविमा कंपनीने अपात्र ठरविले आहेत. अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या सीएससी केंद्राकडे पाठविल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.