दिल्लीचे मुख्यंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली. ईडीने गुरुवारी त्यांना अटक केली. यासंदर्भात आता समाज सेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेला, त्यांच्या कर्माचे फळ म्हटले आहे. एवढेच नाही, तर कधीकाळी केजरीवाल दारू बंदी विरोधातही आपल्या सोबत होते आणि आता ते मद्य धोरण बनवू लागेल आहेत, असे म्हणत अण्णा यांनी दुःखही व्यक्त केले आहे.
राळेगण सिद्धि येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले, 'मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले. पण करेल काय? सत्ते समोर काही चालत नाही. अखेर त्यांना जी अटक कण्यात आली ती त्यांच्या कृती मुळे झाली. आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता. जे झाले आहे, ते कायदेशीर पणे, जे व्हायचे ते होईल. ते सरकार बघेल. विचार करेल.'