येवला, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : येवला शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोन मधील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने शहराला आता पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कमी पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचं आव्हान नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत टप्पा क्रमांक दोन मध्ये नवीन पाण्याचे आवर्तन येत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याच्या आव्हान करण्यात येत आहे.