छत्रपती संभाजीनगर, दि. १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. संभाजीनागर शहरातील म्हाडा कॉलनीमध्ये मागील चार महिन्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर मागील २० दिवसापासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी म्हाडा कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला. हांडे वाजवत घोषणा देत पाण्यासाठी नारा दिलाय. जर पाणीपुरवठा सुरळीत नाही केला तर मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या मांडू असा इशारा यावेळी महिलांनी दिला.