छत्रपती संभाजीनगर, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या नाथसागर धरणात केवळ २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातील जालना, बीड, माजलगाव या जिल्ह्यांना देखील याचा फटका बसणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात छत्रपती संभाजीनगरमधील ही भीषण पाणीटंचाई चिंता वाढवणारी आहे.