पुणे, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. होळी जवळ येत आहे. होळीला कोकणकरांना गावी जाण्यासाठी विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुण्यातून कानपूर, थिविम, सावंतवाडी रोड आणि दानापूरसाठी विशेष एक्स्प्रेस गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.