ठाणे, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : डोबिंवली जिल्ह्यातील सागाव येथील मोती नगर रहिवाशी गेली बारा वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रासले आहेत. ‘पाणी नाही तर, मतदान नाही’ असा आक्रमक पवित्र स्थानिकांनी घेतला आहे. पाण्याचे थकित बिल नागरिकांना वारंवार पाठवले जाते पण ज्या सुविधेसाठी कर आकारले जातात त्या सुविधा लोकांना मिळत नाहीत. अनेकवेळा एमआयडीसीकडे येथील रहिवाशांनी निवेदने दिली परंतु थातूर मातूर उत्तरे देऊन त्यांना परत पाठवले गेले. या कारणाने रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यामुळे रहिवाशांनी थेट रास्ता रोको करू असा इशारा दिला आहे.