छत्रपती संभाजीनगर, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गतवर्षी असमाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील पाणीपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे विविध गावांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.जिल्ह्यातील कन्नड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पैठण या ६ तालुक्यांमधील ९६ गावांना ११० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच १४३ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर अनेक गावाचे टँकरचे प्रस्ताव पडून असल्याने याचा फटाका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणारं आहे.
https://youtu.be/Ck31R49VSIc