सिंधुदुर्ग, ०८ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही महाराष्टातील पृथ्वीवरील स्वर्गाची भुरळ पडली आहे. सचिन आपल्या ५० व्या वाढदिवसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्यावर आला होता. त्याला आता त्याला २५० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. त्याच ट्विट केलंय.
मात्र सिंधुदुर्गातील आदरातिथ्य, आपुलकीपणा आणि भोगवे, किल्ले निवती गाव आजही मनाला भुरळ घालत असल्याचं ट्विट सचिननं केलं आहे. यात सचिननं किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावरील क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ आणि निवती समुद्र किनाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये सचिननं अप्रतिम आदरातिथ्य केलं ते आजही आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणींचा खजिना करून ठेवलं आहे. तर भारतातील सुंदर किनारपट्टी कोकणात असल्याचं देखील म्हटलं आहे.